रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हुकूमशहाचा उदय ( Episode 2)
रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | हुकूमशहाचा उदय ( Episode 2)
मागील भाग 1 वरून पुढे..
अ) लोकशाहीची सावली
पण वास्तव वेगळे होते.
या समाजघटकाचे राजकीय प्रतिनिधित्व करणारा पक्ष म्हणजे रुथरी डेमोक्रॅटिक पार्टी..
दोन्ही पक्षांचे विचार पूर्णपणे वेगळे होते.
एक गट म्हणत होता,
"देशाची स्थिरता सर्वांत महत्त्वाची."
दुसरा म्हणत होता,
"स्थिरतेच्या नावाखाली अन्याय स्वीकारायचा नाही."
निवडणुका होत होत्या,
प्रचार होत होता,
सभा होत होत्या,
पण निकाल लागल्यानंतर जनतेच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उमटत असे.
"मतदान आपण करतो पण सरकार नेमकं बनवतं कोण?"
सन १९८१ नंतर जवळजवळ प्रत्येक निवडणुकीत रुथरी डेमोक्रॅटिक पार्टीच सत्तेत येत राहिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र वेगळे चित्र रंगवले जात होते.
परदेशी माध्यमांसमोर रुथरीला "प्रशांत महासागरातील स्थिर लोकशाही" म्हणून सादर केले जात होते.
गुंतवणूक वाढत होती.
खनिजांचे करार होत होते.
महासत्ता समाधानी होत्या.
पण..
रुथरीची जनता समाधानी नव्हती.
ग्रामीण भागात बेरोजगारी वाढत होती.
खनिजसंपत्ती बाहेर जात होती.
संपत्ती निर्माण होत होती..
पण तिचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हता.
लोकांच्या मनात असंतोष साचत होता.
आणि असंतोष जेव्हा दीर्घकाळ दाबला जातो..
तेव्हा तो अधिक तीव्र होतो.
रुथरीचे राजकारण हळूहळू अशा वळणावर येऊन पोहोचले होते, जिथे लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील सीमारेषा धूसर होऊ लागली होती.
आणि त्या अस्थिरतेकडे एक माणूस अत्यंत बारकाईने पाहत होता.
तो राजकारणी नव्हता.
तो उद्योगपती नव्हता.
तो विरोधी पक्षाचा नेता नव्हता.
तो होता..
रुथरीच्या सैन्याचा सर्वोच्च अधिकारी.
जनरल माँटेरो.
राजकीय नेते एकमेकांशी लढत होते.
जनता दोन गटांत विभागली जात होती.
आणि जनरल माँटेरो..
शांतपणे योग्य क्षणाची वाट पाहत होता.
कारण इतिहासाने त्याला एक गोष्ट शिकवली होती.
जेव्हा राजकारणी देश चालवण्यात अपयशी ठरतात तेव्हा सत्ता अनेकदा बंदुकीच्या नळीमधून बाहेर येते.
संपूर्ण देश दोन विचार सरणींमध्ये विभागला गेला होता.
एका बाजूला स्थैर्याच्या नावाखाली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न सुरू होता.
दुसऱ्या बाजूला बदलाची मागणी दिवसेंदिवस आक्रमक होत होती.
याच गोंधळात..
रुथरीच्या लष्कराने शांतपणे परिस्थितीचा अभ्यास सुरू ठेवला.
त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांना एक गोष्ट वारंवार जाणवत होती.
जनरल माँटेरो कधीच घाई करत नव्हता.
तो योग्य क्षणाची वाट पाहत होता.
आणि तो क्षण अखेर आला.
रस्त्यांवर धूर होता..
दगडफेक होती..
गोळीबाराचे आवाज घुमत होते..
आणि संसदेत आरोप-प्रत्यारोप सुरू होते.
त्याच रात्री..
रुथरीच्या इतिहासाने अनपेक्षित वळण घेतले.
पहाटे चार वाजता राजधानी पोर्ट एमेरादोमध्ये रणगाडे रस्त्यावर उतरले.
देशभरातील दूरचित्रवाणी वाहिन्यांचे नियमित प्रसारण अचानक थांबले.
आणि मग..
स्क्रीनवर जनरल माँटेरो दिसला.
त्याच्या मागे रुथरीचा राष्ट्रध्वज होता.
दोन्ही बाजूंना सशस्त्र सैनिक उभे होते.
काही क्षण तो न बोलता कॅमेऱ्याकडे पाहत राहिला.
मग शांत, निर्विकार आवाजात म्हणाला,
"रुथरीच्या नागरिकांनो..
संसद तात्पुरती बरखास्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येत आहे.
जोपर्यंत देशात स्थैर्य निर्माण होत नाही, तोपर्यंत सशस्त्र दलच प्रशासन चालवेल."
संदेश अवघ्या तीन मिनिटांचा होता.
पण त्या तीन मिनिटांनी रुथरीचा इतिहास बदलला.
काही ठिकाणी लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
त्यांना वाटले,
"आता तरी हिंसा थांबेल."
पण काहींना लगेचच समजले,
की आता लोकशाहीचा श्वास गुदमरू लागणार..
पुढील काही महिन्यांतच जनरल माँटेरोने आपल्या सत्तेची मुळे खोलवर रोवली.
संसद केवळ नावापुरती उरली.
न्यायव्यवस्थेतील महत्त्वाच्या नियुक्त्या त्याच्या मर्जीने होऊ लागल्या.
प्रसारमाध्यमांवर कठोर सेन्सॉरशिप लादण्यात आली.
सरकारविरोधी बातम्या गायब होऊ लागल्या.
रात्री उशिरा काही लोकांना अटक होत असे,
आणि सकाळी ते कुठे आहेत, हे कोणालाच माहीत नसे.
भीती हळूहळू रुथरीची नवी भाषा बनत होती.
राजकीय विश्लेषकांच्या मते, माँटेरोला जगातील एका बलाढ्य महासत्तेचा मूक पाठिंबा मिळत होता.
त्याच्या बदल्यात..
खनिज करार सुरू राहिले.
लष्करी सहकार्य सुरू राहिले.
आंतरराष्ट्रीय मंचावर त्याच्यावर फारसा दबाव आणला गेला नाही.
मात्र...
जनरल माँटेरोला एक गोष्ट अजून कळली नव्हती.
सत्ता त्याने जिंकली होती..
पण संपूर्ण सैन्य नाही.
आणि त्याच सैन्यात..
एक अधिकारी शांतपणे योग्य वेळेची वाट पाहत होता.
त्याचे नाव होते..
लेफ्टनंट जनरल महारथ, भारतीय वंशाचा वरिष्ठ सैन्य अधिकारी..
क) शांत वादळ
जनरल माँटेरोने सत्ता हस्तगत केल्यानंतर रुथरी वरवर शांत झाला होता.
रस्त्यांवरील निदर्शने थांबली होती.
सरकारी कार्यालये नियमित सुरू होती.
कारखान्यांच्या चिमण्या पुन्हा धूर सोडत होत्या.
बंदरांवर जहाजांची ये-जा सुरू होती.
परदेशी गुंतवणूकदार पुन्हा रुथरीकडे वळू लागले होते.
जगाला वाटत होते
रुथरीमध्ये स्थैर्य परतले आहे.
पण ते स्थैर्य नव्हते..
ती भीती होती.
सर्वत्र दमनशाही सुरू होती,
मात्र जनरल माँटेरोला एक गोष्ट पूर्णपणे आपल्या ताब्यात आणता आली नव्हती.
रुथरीचे सैन्य.
वरकरणी ते पूर्णपणे एकसंध दिसत होते.
सर्व अधिकारी एकाच गणवेशात होते.
सर्व सैनिक एकाच ध्वजाला सलाम करत होते.
पण त्या गणवेशामागे एक अदृश्य फूट वर्षानुवर्षे वाढत होती.
एका बाजूला फ्रेंच आणि इतर युरोपीय वंशाचे वरिष्ठ अधिकारी होते.
दुसऱ्या बाजूला भारतीय, माओरी आणि आफ्रिकन वंशाचे अधिकारी व सैनिक होते.
कोणीही उघडपणे बंड करत नव्हते.
कोणी घोषणाबाजी करत नव्हते.
कोणी आदेश मोडत नव्हते.
पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न होता
"आपण देशासाठी लढतो आहोत की एका माणसासाठी?"
या दुसऱ्या गटाचा चेहरा होता..
लेफ्टनंट जनरल महारथ.
भारतीय वंशाच्या एका साध्या सैनिकाच्या घरात जन्मलेला महारथ आपल्या कर्तृत्वावर सैन्याच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचला होता.
त्याने अनेक सीमावर्ती मोहिमा यशस्वी केल्या होत्या.
समुद्री चाचे ,दरोडेखोरांविरुद्ध कारवाया केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय शांतता मोहिमांमध्ये रुथरीचे नेतृत्व केले होते.
त्याच्या नावावर शौर्यपदके होती.
पण त्याचा सर्वात मोठा सन्मान कोणताही पदक नव्हते..
तर सैनिकांचा विश्वास होता.
तरुण अधिकारी त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहत.
जवान त्याच्यासाठी जीव देण्यास तयार होते.
आणि सामान्य नागरिक..
त्याला वरिष्ठ सैन्य अधिकारी नव्हे, तर राष्ट्ररक्षक मानत होते.
एकदा संरक्षण मंत्रालयात झालेल्या बैठकीत माँटेरोने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नजर फिरवली.
शेवटी त्याची नजर महारथवर स्थिरावली.
काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले.
ना शब्द.
ना हसू.
ना राग.
फक्त शांत नजर.
त्या काही सेकंदांत उपस्थित प्रत्येक अधिकाऱ्याला जाणवले
या खोलीत दोन सेनानी उभे आहेत.
एकाकडे सत्ता आहे.
दुसऱ्याकडे जनतेचा विश्वास.
जनरल माँटेरोला, लेफ्टनंट जनरल महारथला अटक करणे शक्य होते.
पण त्याची खूप मोठी किंमत त्याला चुकवावी लागली असती.
जर महारथला काही झाले..
तर सैन्याचे दोन तुकडे होतील.
देशात गृहयुद्ध भडकू शकते.
रुथरीचे दोन तुकडे पडू शकतात.
म्हणून माँटेरोने वेगळीच रणनीती स्वीकारली.
त्याने महारथला पदावर ठेवले.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्याचा सन्मान केला.
पण..
महत्त्वाच्या निर्णयांपासून त्याला जाणीवपूर्वक दूर ठेवले.
त्याच्यावर सतत गुप्त नजर ठेवली.
त्याच्या प्रत्येक भेटीची, प्रत्येक प्रवासाची आणि प्रत्येक फोन कॉलची नोंद ठेवली जात होती.
दुसरीकडे महारथही शांत बसलेला नव्हता.
त्याने घाई करण्यास नकार दिला.
त्याला माहिती होते,
बंदुकीच्या जोरावर सत्ता बदलता येते..
पण राष्ट्र वाचवता येत नाही.
जर त्याने अकाली बंड पुकारले..
तर हजारो सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकतील.
निरपराध नागरिक मारले जातील
रुथरी अनेक दशकांसाठी अराजकतेच्या गर्तेत जाईल.
त्याला तसे होऊ द्यायचे नव्हते,
म्हणून त्याने संयमाची वाट निवडली.
त्याने आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांचे एक अदृश्य जाळे उभे केले.
ते कोणत्याही संघटनेचे सदस्य नव्हते.
ते बंडखोर नव्हते.
ते देशद्रोही नव्हते.
ते फक्त एका योग्य क्षणाची वाट पाहत होते.
कारण महारथला खात्री होती..
हुकूमशाहीची सर्वात मोठी कमजोरी बाहेर नसते.
ती तिच्याच आत मध्ये दडलेली असते.
आणि एक दिवस..
ती कमजोरी स्वतःच तिच्या पतनाचे कारण ठरते.
त्या रात्री संरक्षण मंत्रालयाच्या आपल्या कार्यालयात बसलेल्या महारथने टेबलावर पसरलेल्या रुथरीच्या नकाशाकडे बराच वेळ पाहिले.
त्याने हळूहळू नकाशा गुंडाळला.
खिडकीबाहेर नजर टाकली.
आणि स्वतःशीच पुटपुटला,
"ती वेळ अजून आलेली नाही.."
"पण जेव्हा ती येईल, तेव्हा एकही गोळी झाडावी लागणार नाही."
त्याच क्षणी..
क्रमशः...🖋️📖📚
🔗रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेट | ट्विन्स (एपिसोड 3 )👉
रिपब्लिक ऑफ रुथरी | ऑपरेशन सायलेंट चेकमेटच्या तिसऱ्या भागात कथानक निर्णायक टप्प्यावर पोहोचते. जनरल माँटेरोच्या अभेद्य सुरक्षा कवचातील एकमेव कमकुवत दुवा शोधण्यात लेफ्टनंट जनरल महारथ यशस्वी होतात.
✍️ SJ OMKAR | शब्दांची मुशाफिरी
© All Rights Reserved


कथानकाची उभारणी आणि वातावरणनिर्मिती अप्रतिम. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
उत्तर द्याहटवाप्रत्येक परिच्छेद वाचताना एखादा राजकीय थ्रिलर चित्रपट पाहत असल्याचा अनुभव आला.
उत्तर द्याहटवाया साठी पुढे सुद्धा वाचत रहावे..
हटवाधन्यवाद...
उत्तर द्याहटवा